राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सोशल मिडीयाच्या वापरावर कात्री ; नविन नियमावली !

Spread the love

@marathipepar वैशाली पवार प्रतिनिधी [ New regulations on the use of social media by state government officials/employees ] : राज्य सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सोशल मिडीयाच्या वापरावर आता यापुढे कात्री लागणार आहे , या संदर्भात राज्य सरकारकडून राज्य जनसुरक्षा अधिनियम सादर केला आहे .

यांमध्ये राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सोशल मिडीयावरील वापरास बंदी येणार आहे . सदर जनसुरक्षा विधेयकास मंजूरी मिळाल्यानंतर राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना सोशल मिडीयाचा वापर करताना यापुढे काळजी घ्यावी लागणार आहे .

प्राप्त माहितीनुसार , सरकारी अधिकारी / कर्मचारी सोशल मिडीयावर नेहमी सक्रिय असतात , बऱ्याच वेळा समाजहिताच्या विरोधात देखिल पोस्ट करण्यात येते , ही बाब चुकीची आहे , याकरीता लवकरच नविन नियमावली जाहीर करण्यात येईल , असे स्पष्टीकरण राज्याचे मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिले होते .

त्याच्या अनुसरुनच जन सुरक्षा अधिनियम 2024 तयार करण्यात आले आहेत , यांमध्ये शासन विरोधी संघटना तसेच बेकायदेशीर संघटना यावर बंदी टाकण्यात येणार असुन दोषींना कडक शिक्षाची तरतुद प्रस्तावित करण्यात आलेली आहे .

हे पण वाचा : भिवंडी निजामपुर शहर पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या 111 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

याकरीता महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 त्याचबरोबर जिल्हा परिषद कर्मचारी वर्तवणूक नियम 1967 मध्ये सोशल मिडीया वापर संदर्भात बदल करण्यात येणार आहेत .

सदर बाबींमुळे राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना विविध आंदोलने करताना काळजीपुर्वक करावे लागणार आहेत , अन्यथा त्यांच्यावर कार्यवाही केली जावू शकते . यामुळे सदर जनसुरक्षा विधेयकास राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांकडून विरोध दर्शविला जात आहे .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment