@marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ This work will have to be done after the employees complete 18 years of service; Important instructions from the government. ] : सरकारी नोकरी ही अधिक सुरक्षित मानली जाते , सरकारी नोकरीमध्ये कर्मचाऱ्यांना सेवेत असताना तसेच सेवानिवृत्तीनंतर बरेच सामाजिक व आर्थिक लाभ मिळतात .
सदर सेवेचा लाभ घेण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या सेवाकाळामध्ये आपल्या महत्वपुर्ण नोंदी सतत अपडेट करणे आवश्यक असते . ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पश्चात्य त्याच्या योग्य वारसांना सदर लाभ देता येईल .
केंद्र सरकारच्या कार्मिक व निवृत्तीवेतन कल्याण विभाग मार्फत निर्गमित करण्यात आलेल्या एका अध्यादेशानुसार , त्याच्या सेवेच्या 18 वर्षे पुर्ण झाल्याच्या नंतर त्याने आपली पडताळणी करुन घेणे अनिवार्य असेल . सदरचे अध्यादेश केंद्र सरकारच्या सर्वच विभागांस दिले गेले आहेत .
कर्मचारी सेवेत रुजु झाल्याच्या नंतर सेवेच्या 18 वर्षे नंतर त्याने आपले सर्व कागदपत्रांची पुन्हा एकदा पडताळणी करुन घेणे आवश्यक असेल . शिवाय नियुक्ती पश्चात सादर करावयाचे सर्व आवश्यक कागदपत्रे जसे कि , चारित्र्य पडताळणी अहवाल , वैद्यकीय अहवाल ( वयोमानानुसार ) , 50/55 वर्षे नंतर सेवा पुढे चालु ठेवणे बाबत आदेश आपल्या सेवेचा तपशिल ..
हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना हे 02 आर्थिक लाभ एकदाच ; पगारात मोठी वाढ !
वेतनश्रेणी , वाढीव आर्थिक लाभ , अदा करण्यात आलेले देय भत्ते संबंधित लेखा कार्यालय मार्फत पडताळणी करुन घेणे आवश्यक असल्याचे निर्देश सदर केंद्र सरकाच्या अध्यादेशांमध्ये देण्यात आलेले आहेत .
पडताळणीची आवश्यकता : निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांस पेन्शन प्राप्ती करीता , कर्मचाऱ्यांचे सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाते , यांमध्ये त्रुटी असणाऱ्या बाबींची पुर्तता कर्मचाऱ्यांस निवृत्तीपुर्वीच करता यावे , याकरीता कर्मचाऱ्यांना 18 वर्षे सेवा पुर्ण झाल्यानंतर आपल्या सेवापुस्तकाची पडताळणी करुन घेणे आवश्यक आहे .
- Post Office Best Scheme | पोस्ट ऑफिस ची भन्नाट योजना ! 1000/- रुपये ,गुंतवणुकीवर मिळवा तीन लाखांचा परतावा !
- राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चितीचे प्रसंग – म.नागरी ( वेतन ) नियम ; जाणून घ्या सविस्तर ..
- भारतीय सैन्य पाकिस्तानच्या कराची , लाहोर शहरापर्यंत आत घुसले ; तर बलुचिस्तान मध्ये BLA ताबा ..
- या दिवशी लागणार इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !
- कर्मचाऱ्यांचे सेवेचे 18 वर्षे पुर्ण झाल्यानंतर करावे लागणार हे काम ; सरकारचे महत्वपुर्ण निर्देश .