दर 03 वर्षानंतर शिक्षकांची परीक्षा घेण्याची शिफारस ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !

Spread the love

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Schedule for universal transfer of state employees in 2025 announced; Know the circular. ] : शिक्षकांची भूमिका ही विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी मोठी महत्वाची आहे , यामुळे शिक्षकांची दर 03 वर्षानंतर परीक्षा घेतली पाहिजे , अशी शिफारस सुधा मुर्ती यांनी केल्या आहेत .

सुधा मुर्ती ह्या प्रसिद्ध लेखिका , शिक्षिका व ते सध्या राज्यसभेच्या सदस्या आहेत , त्यांनी संसदेत शिक्षकांची दर 03 वर्षानंतर परीक्षा घेण्याची शिफारस केली आहे . ते संसदेत बोलताना म्हणाल्या कि , केवळ शाळांच्या चांगल्या इमारती बांधून शिक्षणाचा दर्जा सुधारणा नाही ..

तर चांगले दर्जेदार शिक्षकांची आवश्यक आहे , याकरीता दर 03 वर्षांनी शिक्षकांची परीक्षा घेतली पाहिजे . एका वेळी अध्यापनाचे शिक्षण ( बी.ए , एमए अथवा पीएचडी ) घेवून अध्यापनाचे कार्य सुरु करणाऱ्या शिक्षकांची निवृत्ती पर्यंत कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जात नाही . यामुळे किदान 03 वर्षांनी एकदा तरी प्राथमिक स्तरावर शिकविणाऱ्या शिक्षकांचे प्रशिक्षण तसेच परीक्षांचे आयोजन करणे आवश्यक आहे , अशी शिफारस त्यांनी केल्या .

पुढे त्या बोलल्या कि , शिक्षकांसाठी अनेक प्रकारचे प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात येत आहेत , परंतु यांमध्ये परीक्षांचे आयोजन नाही . यामुळे दर 03 वर्षांनी परीक्षा घेतल्या पाहिजेत , ज्यामध्ये अध्यापन तंत्रांचा समावेश करणे आवश्यक आहे .या शिफारशीचे समर्थन राष्ट्रवादी – एससीपी चे खासदार फौजिया खान यांच्याकडून देखिल करण्यात आले .

Leave a Comment