@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ rain Update news ] : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील चार दिवस ( दिनांक 30 जून पर्यंत ) 22जिल्ह्यांना तुफान जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .
आज दिनांक 25 जून 2025 पासून दिनांक 30 जून पर्यंत राज्यातील मुंबई , पुणे अशा प्रमूख शहरासह 22 जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी लागणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे .
आज दिनांक 25 जून रोजी राज्यातील रत्नागिरी , रायगड , ठाणे , पालघर या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . याशिवाय नाशिक घाट , पुणे , सातारा , कोल्हापूर या भागामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .
दिनांक 25 ते 30 जून या कालावधीमध्ये नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्रावरून पुढे वाटचाल करणार असल्याने , महाराष्ट्र राज्यसह उत्तरेकडे राज्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
हे पण वाचा : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
यामध्ये राज्यातील नांदेड , परभणी , जालना , हिंगोली , छत्रपती संभाजीनगर , जळगाव , नाशिक , धुळे , नंदुरबार याशिवाय विदर्भातील सर्व जिल्हे तसेच कोकणातील मुंबई , सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये जोरदार मुसळधार पावसाची शक्यता पुढील चार दिवसात वर्तवण्यात आलेली आहे .
त्याचबरोबर सातारा, पुणे , सांगली, कोल्हापूर , अहिल्यानगर , सोलापूर ,लातूर या जिल्ह्यामध्ये तुरळ ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .
- राज्यात सुधारित PM विमा योजना खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम 2025-26 राबविणेबाबत ; GR निर्गमित दि.24.06.2025
- राज्यातील “या” 22 जिल्ह्यांना पुढील 04 दिवस तुफान जोरदार पावसाची शक्यता ; जाणून घ्या सविस्तर IMD अंदाज !
- सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना 30 सप्टेंबरची डेडलाईन ; पाहा सविस्तर वृत्त !
- आज दि.24 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 08 महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय !
- बदली प्रक्रिया 2025 संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.23.06.2025