राज्यातील “या” 22 जिल्ह्यांना पुढील 04 दिवस तुफान जोरदार पावसाची शक्यता ; जाणून घ्या सविस्तर IMD अंदाज !

Spread the love

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ rain Update news ] : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील चार दिवस ( दिनांक 30 जून पर्यंत ) 22जिल्ह्यांना तुफान जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .

आज दिनांक 25 जून 2025 पासून दिनांक 30 जून पर्यंत राज्यातील मुंबई , पुणे अशा प्रमूख शहरासह 22 जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी लागणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे .

आज दिनांक 25 जून रोजी राज्यातील रत्नागिरी , रायगड , ठाणे , पालघर या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आलेली आहे . याशिवाय नाशिक घाट , पुणे , सातारा , कोल्हापूर या भागामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .

दिनांक 25 ते 30 जून या कालावधीमध्ये नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्रावरून पुढे वाटचाल करणार असल्याने , महाराष्ट्र राज्यसह उत्तरेकडे राज्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .

हे पण वाचा : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

यामध्ये राज्यातील नांदेड , परभणी , जालना , हिंगोली , छत्रपती संभाजीनगर , जळगाव , नाशिक , धुळे , नंदुरबार याशिवाय विदर्भातील सर्व जिल्हे तसेच कोकणातील मुंबई , सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये जोरदार मुसळधार पावसाची शक्यता पुढील चार दिवसात वर्तवण्यात आलेली आहे .

त्याचबरोबर सातारा, पुणे , सांगली, कोल्हापूर , अहिल्यानगर , सोलापूर ,लातूर या जिल्ह्यामध्ये तुरळ ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment